परीक्षा लांबणीवर टाकण्याबाबत महाराष्ट्राचे अन्य बोर्डांना पत्र

Board Update: महाराष्ट्रातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आता देशातील अन्य राष्ट्रीय बोर्डांनाही आवाहन केलं आहे. त्यांनी सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि केम्ब्रिज या चार महत्त्वाच्या बोर्डांना पत्र लिहून परीक्षा रद्द करण्याचं आवाहन केलं आहे. राज्यात राज्य मंडळामार्फत लाखो विद्यार्थी दहावी आणि बारावीची परीक्षा देणार आहेत. याशिवाय अन्य हजारो विद्यार्थी खासगी शाळांमार्फत सीबीएसई, आयसीएसई, आयबी, केम्ब्रिज बोर्डामार्फत दहावी, बारावीच्या परीक्षा देणार आहेत. राज्यातील या सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य ही राज्याच्या महाविकास आघाडी सरकारची प्राथमिकता आहे, असे सांगत गायकवाड यांनी या बोर्डांना पत्र लिहून परीक्षांबाबत निर्णय घेण्याची विनंती केली आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्या लिहितात, 'तुमचं आरोग्य ही महाविकास आघाडी सरकारची प्राथमिकता आहे. कोविड-१९ विषाणूचं स्वरुप आणि प्रसार पाहता महाविकास आघाडी सरकारला वाटतं की आताच्या घडीला तरी परीक्षांचे आयोजन करणे बिलकुल अनुकूल नाही. म्हणूनच आम्ही परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे सीबीएसई, आयसीएसई आणि अन्य बोर्डांना देखील आम्ही पत्र लिहून परीक्षा रिशेड्युल करायला सांगितल्या आहेत.' दरम्यान, करोना संक्रमणाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा अखेरीस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा मे अखेर तर दहावी परीक्षा जून महिन्यात घेतली जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची यासंदर्भात महत्त्वाची बैठक सोमवारी पार पडली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. करोना संक्रमणाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा अखेरीस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा मे अखेर तर दहावी परीक्षा जून महिन्यात घेतली जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tgDRQi
via IFTTT

Post a Comment

0 Comments