Also visit www.atgnews.com
दहावीची परीक्षाच नाही तर, बोर्डाची गुणपत्रिका कशी? गोंधळ कायम
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्य शिक्षण मंडळामार्फत न घेता शाळा स्तरावर होणार असेल, तर त्यांना मंडळामार्फत गुणपत्रिका द्यावी का? इथपासून ते अकरावी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घ्यावी का? इथपर्यंत विविध विषयांवर बुधवारी उच्च स्तरीय बैठकीत चर्चा झाली. पहिल्या चर्चेच्या फेरीत याबाबत निर्णय झाला नसला, तरी कोणत्याही मुद्यावर एकमतही होऊ शकले नाही. यामुळे याबाबतचा गोंधळ अद्याप कायम आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीची परीक्षा रद्द केली आहे. आता दहावीचे मूल्यमापन कसे करावे इथपासून ते अकरावी प्रवेश नेमके कसे करावे याबाबत बुधवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थित बैठक झाली. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा अंतर्गत मूल्यमापनाद्वारे शाळा स्तरावर होणार असेल, तर मंडळातर्फे प्रमाणपत्र कसे द्यावे, असा प्रश्नही चर्चेला आला. मात्र, दरवर्षी शाळांकडून येणारे अंतर्गत गुण ग्राह्य मानून मंडळ त्यांचा गुणपत्रिकेत समावेश करत असते. याचबरोबर सध्या विद्यापीठांमध्येही कॉलेज स्तरावर परीक्षा होत आहेत. कॉलेज विद्यार्थ्यांचे गुण विद्यापीठाला कळविते त्यानुसार निकाल प्रसिद्ध केला जातो. या पर्यायाचा स्वीकार करावा, असेही समोर आले. इयत्ता दहावीचे गुण विविध स्पर्धा परीक्षांपासून ते नोकरीच्या प्रथम पायरीसाठी ग्राह्य धरले जातात. यामुळे मंडळाची गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळणे योग्य राहील, असे मत काही तज्ज्ञांनी मांडल्याचे सूत्रांनी सांगितले. याचबरोबर या बैठकीत प्रामुख्याने अकरावीच्या प्रवेशासंदर्भात केवळ प्राथमिक चर्चा झाली असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. मुंबई, पुणे नाशिक, औरंगाबाद, नागपूर आदी महापालिका क्षेत्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही मुंबई उच्च न्यायालयाने गुणवत्तेला प्राधान्य देण्यासाठी ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने होते. यासाठी गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य दिले जाते. परंतु, आता दहावीच्या परीक्षेत सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार असल्याने ही प्रवेश प्रक्रिया कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय मुंबईसारख्या शहरात असलेल्या अल्पसंख्याक आणि नामांकित कॉलेजांत प्रवेश कसे दिले जातील, यावरही चर्चा सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर तज्ज्ञ सल्लागार समितीच्या सदस्यांनी मुंबई, पुणे महापालिका क्षेत्रासाठी एखादी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेता येईल का, अकरावीची प्रवेश परीक्षा कशा पद्धतीची असेल असा विषय समोर आणला होता. त्यासोबतच अकरावीच्या प्रवेशासाठी विविध पर्यायांचा विचार या बैठकीत करण्यात आला असला, तरी कोणताही निर्णय मात्र घेण्यात आला नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईत सीबीएसईसह अन्य शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांची टक्केवारी आणि गुणवत्ता प्रत्येक वर्षी सर्वाधिक असते.त्यामुळे मुंबई-पुण्यासारख्या शहरात सीबीसीईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देताना कोणते निकष लावले जातील हे अद्याप स्पष्ट नाही. यामुळे इतर मंडळाच्या सदस्यांशीही चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे समजते. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dGTVp6
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments