Also visit www.atgnews.com
नववी, अकरावीचे मूल्यमापन करा; मात्र वर्गोन्नती आवश्यक
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देताना शाळांनी आतापर्यंत घेतलेल्या चाचण्यांच्या माध्यमातून अथवा त्यांच्या स्तरावर योग्य असेल त्या पद्धतीने मूल्यमापन करावे, असे राज्य सरकारने शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. मात्र हे करत असताना विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देणे बंधनकारक राहील असेही या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने इयत्ता पहिली ते आठवी प्रमाणेच इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही वर्गोन्नती देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. माध्यमिक शाळा संहितेमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावर विषय शिक्षकांच्या समितीचे गठन करुन इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे शाळेने आयोजित केलेल्या चाचण्यांमधील, प्रात्यक्षिकांमधील, अंतर्गत मूल्यमापनातील अथवा विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय चाचाण्या घरी सोडविण्यास देऊन किंवा सोयीच्या पद्धतीने गुणांकन देण्याचा निर्णय शाळास्तरावर घ्यावा असे शुक्रवारी प्रसिद्ध् झालेल्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र हे करत असताना इयत्ता नववी व इयत्ता अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देणे बंधनकारक असेल असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर वेगळ्या सत्र नोंदी न करता सदर समितीने विचारात घेतलेल्या मूल्यमापन साधनामधील विषयनिहाय प्राप्त गुणांचा उल्लेख करून प्रचलित पद्धतीने गुणपत्रक तयार करावे असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे इयत्ता नववी व अकरावीत शिकणाऱ्या ३१ लाख २० हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Q7uqnM
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments