CBSE बारावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात SC त याचिका दाखल

2021: करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे सीबीएसई बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात आहे तर दुसरीकडे CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका केरळचे शिक्षक टोनी जोसेफ यांनी दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की परीक्षा रद्द करणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य होणार नाही. ही याचिका सुप्रीम कोर्टात परीक्षा रद्द करण्याच्या आणि मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेच्या विरोधात दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे आणि उच्च शिक्षण संस्थांमधील प्रवेश, परीक्षांच्या निकालावर अवलंबून आहे. शिक्षणतज्ज्ञ आणि संस्थाप्रमुखांपैकी बहुतांशजण परीक्षा आयोजित करण्याच्या बाजूचे आहेत. शिक्षणतज्ज्ञांचं म्हणणं आहे की परीक्षा रद्द करायला नको, डिजीटल माध्यमांद्वारे ती आयोजित करावी. याचिकेत म्हटले आहे की बोर्ड परीक्षा आयोजित करायला हवी; अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करणे अयोग्य होईल. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोणत्याही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहिलेले देखील नाही. शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. या याचिकेत असेही म्हटले आहे की बारावीची परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळण्यात यायला हवी. वकील ममता शर्मा यांनी CBSE आणि ICSE च्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र या याचिकेवर अद्याप सुनावणी व्हायची आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fvr7zE
via IFTTT

Post a Comment

0 Comments