Also visit www.atgnews.com
CBSE दहावीचा निकाल रखडणार; शाळांना गुण जमा करण्यासाठी दिली मुदतवाढ
Update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने शाळांसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुण जमा करण्याची मुदत वाढवली आहे. आता सीबीएसई आणि संलग्न शाळा ३० जूनपर्यंत विद्यार्थ्यांचे गुण मंडळाकडे सादर करू शकणार आहेत. याव्यतिरिक्त बोर्डाने इयत्ता दहावीच्या रद्द केलेल्या बोर्ड परीक्षांचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण जमा करण्याची तारीख देखील ३० जून पर्यंत वाढवली आहे. कोविड - १९ महामारीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे आरोग्य आणि सुरक्षा ध्यानात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसईने इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षांचे गुण वेबसाइटवर अपलोड करण्याच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. सीबीएसईने म्हटलं आहे की 'सीबीएसईने शिक्षकांची सुरक्षितता आणि आरोग्यास सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. महामारीच्या स्थितीत राज्यांतील लॉकडाऊन आणि संलग्न शाळांच्या शिक्षकांची आणि अन्य कर्मचाऱ्यांची सुरक्षा ध्यानात घेऊन सीबीएसईने तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.' यापूर्वी, सीबीएसईने म्हटले होते की दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुण ११ जूनपर्यंत शाळांनी जमा करायचे आहेत आणि निकाल २० जूनपर्यंत घोषित केला जाणार. मात्र आता ३० जूनपर्यंत गुण जमा करायचे असल्याने साहजिक दहावीच्या निकालास विलंब होणार आहे हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fq9aT5
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments