LLB परीक्षेचा निर्णय विद्यापीठ घेणार,बार काउंसिल ऑफ इंडियाची परवानगी

:करोनाच्या पार्श्वभूमीवर LLB परीक्षेचा निर्णय घेण्याबाबत विद्यापीठ स्वतंत्र आहेत असे बार काऊंसिल ऑफ इंडियाने (BCI) म्हटले आहे. त्यामुळे परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठ आपल्या स्तरावर निर्णय घेणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर कशा होणार ? असा प्रश्न विचारला जात होता. LLB पदवी देण्यासाठी आणि पुढच्या वर्षात जाण्यासाठी सर्व संस्थांना आणि विद्यापीठांना परीक्षा घेणे अनिवार्य असल्याचे बार काऊंसिल ऑफ इंडियाने म्हटले आहे. परीक्षा घेण्यासंदर्भातील निर्णय विद्यालयांवर सोडला जावा. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करावे हा निर्णय देखील त्यांनीच घ्यावा. इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधिष गोविंद माथूर यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समितीने ही शिफारस केली आहे. BCI ने आपल्या पत्रकात याबद्दल माहिती दिली. बीसीआयच्या नेव्हिग्रेटमध्ये लिहिलेले की, विद्यापीठ / शैक्षणिक शिक्षण केंद्र परीक्षा निर्धारित करण्यासाठी स्वतंत्र आहेत. [ऑनलाईन / ऑफलाइन / मिश्र / ऑनलाइन खुली पुस्तक परीक्षा (एबीई) हे ठरवू शकतात. तसेच मूल्यांकन करताना देखील असाइनमेंट आधारित मूल्यांकन (एबीई) चा निर्णय देखील घेऊ शकतातअसे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक असुविधा होऊ नये यासाठी नियमित आणि बॅकलॉग परीक्षांदरम्यान अवधी विद्यापीठांकडून दिला जावा असे सांगण्यात आले. देशभरातील लॉ स्कूलच्या विद्यार्थी, पालकांनी परीक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. देशातील करोना प्रादुर्भावामुळे विचार करुनच निर्णय घेतला जाईल असे BCI ने म्हटले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gtFRiX
via IFTTT

Post a Comment

0 Comments