Also visit www.atgnews.com
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लवकरच? परीक्षा परिषदेकडून अंतरिम उत्तरसूची जाहीर
म. टा. प्रतिनिधी, नाशिक मुंबई वगळता इतर जिल्ह्यात १२ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल () लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई जिल्ह्यातील परीक्षेचे नियोजन अद्याप झाले नसले, तरी राज्य परीक्षा परिषदेने निकालाची कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठीची अंतरिम उत्तरसूची परिषदेच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. दोन सप्टेंबरपर्यंत त्यासाठीच्या त्रुटी व आक्षेप नोंदविता येणार आहेत. त्यानंतर अंतिम उत्तरसूचीसह निकालप्रत तयार करण्याची कार्यवाही सुरू होणार असल्याचे परिषदेने सांगितले. करोना संसर्गामुळे फेब्रुवारी २०२० पासून चार वेळेस पुढे ढकलेली पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा (5th, 8th scholarship exam) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे अखेरीस १२ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील ३११ केंद्रांवर घेण्यात आली. १७ भरारी पथकांच्या देखरेखीत शिस्तबद्धपणे ही परीक्षा ऑफलाइन स्वरूपात झाली. यावेळी पेपर-१ पेक्षा पेपर-२ ची काठिण्यपातळी अधिक असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. वर्षभरापासून या परीक्षेची तयारी केल्यानंतर पुढील वर्गात प्रवेशित झाल्यावरही मागील अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा दिल्याने विद्यार्थ्यांची खरी 'कसोटी' पाहिली गेली. त्यामुळे या परीक्षेचा निकाल आणि गुणवत्ता यादी केव्हा जाहीर होते. याकडे विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांचे लक्ष लागले आहे. करोना संसर्गामुळे परीक्षा लांबल्याने यंदा या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यास उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण घोषित केले जाणार नाही. पात्र किंवा अपात्र या स्वरूपात निकाल जाहीर होईल. त्यानुसार प्रत्येक पेपरमध्ये ४० टक्के गुण प्राप्त करणारे विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरतील. या पात्र विद्यार्थ्यांमधून गुणवत्तेनुसार व प्रचलित निकषांच्या आधारे जिल्हानिहाय मंजूर शिष्यवृत्ती संच संख्येच्या मर्यादेत गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल, असे परिषदेने स्पष्ट केले आहे. ...अशा आहेत परिषदेच्या सूचना - विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये 'अंतरिम उत्तरसूची' या पर्यायातून त्रुटी नोंदवता येतील. - दोन सप्टेंबरनंतर नोंदविलेल्या आक्षेपांची नोंद घेतली जाणार नाही. - ई-अर्जाशिवाय टपालाने अथवा ई-मेलद्वारे येणाऱ्या त्रुटी ग्राह्य नसतील. - प्रत्येक अर्जावर स्वतंत्र उत्तर दिले जाणार नाही. - प्राप्त अर्जांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध होईल. दुरुस्तीची संधी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन आवेदन पत्रातील माहिती, नाव, आडनाव बदलण्याची संधी परिषदेने दिली आहे. दोन सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना ही संधी असेल. त्यानंतर निकाल तयार करण्याची कार्यवाही सुरू होईल. त्यामुळे निकालपत्रावर अर्जातील माहिती नोंदविली जाईल. तत्पूर्वी, माहितीची खात्री करून घेण्याचे परिषदेने सूचित केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BcMJdj
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments