दहावीनंतर अकरावी करण्यापेक्षा 'आयटीआय'कडे विद्यार्थ्यांचा ओढा

म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्यातील दहावी उत्तीर्णांनी अकरावीपेक्षा सरकारी ''मध्ये डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पसंती दिली असून, ९० टक्के जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्यामुळे कौशल्याधिष्ठीत रोजगाराभिमुख शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रवेशासाठी ११ नोव्हेंबरपर्यंत मुदत असल्याने, १०० टक्के प्रवेश होण्याची शक्यता आहे. 'व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालया' कडून (डीव्हीईटी) राज्यातील सरकारी आणि खासगी अशा ९७६ 'आयटीआय'मध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यात एकूण ४१७ सरकारी 'आयटीआय' असून, त्यामध्ये ९२ हजार ३११ जागा उपलब्ध आहेत. पैकी ८३ हजार ७४४ जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत. या प्रवेश प्रक्रियेत राज्यातील दोन लाख ५८ हजार ५६८ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते, अशी माहिती 'डीव्हीईटी' च्या अधिकाऱ्यांनी परिपत्रकाद्वारे दिली. प्रशिक्षण संचालनलयाकडून ‘आयटीआय’ला प्रवेश घेण्यासाठी ११ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी ‘आयटीआय’मध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. राज्यात खासगी ‘आयटीआय’ची संख्या ५५९ आहे. त्यामध्ये ४० हजार ८०३ प्रवेशक्षमता उपलब्ध आहे. खासगी ‘आयटीआय’मध्ये आतापर्यंत २७ हजार ७८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेशांसाठी मुदतवाढ मिळणार असल्याने, खासगी ‘आयटीआय’मध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. सरकारी आणि खासगी ‘आयटीआय’मध्ये मिळून एक लाख ११ हजार ५२८ जागांवर प्रवेश पूर्ण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ११ नोव्हेंबरपर्यत प्रवेशसंधी 'आयटीआय' मध्ये प्रवेश घेण्याची अंतिम मुदत ११ नोव्हेंबर आहे. त्यामुळे प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या जवळच्या सरकारी किंवा खासगी ‘आयटीआय'मध्ये संपर्क साधण्याचे आवाहन ‘डीव्हीईटी’कडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी https://ift.tt/2BH1dcn या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावणेदोन लाख जागा रिक्त राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती आदी शहरांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या शहरांमध्ये विद्यार्थी संख्या मोठी असूनही, अकरावीच्या अनेक जागा रिक्त आहेत. या पाच महानगरांमध्ये प्रवेशासाठी पाच लाख ३५ हजार ७१० जागा उपलब्ध असतांनाही तीन लाख ६४ हजार १३४ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे एक लाख ७१ हजार ५७६ जागा रिक्त आहेत. अशीच परिस्थिती राज्यातील अन्य शहरांमध्येही असून, अनेक ज्युनिअर कॉलेजांमध्ये जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्रवेश अकरावीचे पारंपरिक शिक्षण घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी कौशल्याधिष्ठित शिक्षण घेण्याला पसंती दिली आहे. कौशल्याधिष्ठित शिक्षण कोर्स आणि विद्यार्थी प्रवेशाची संख्या सरकारी 'आयटीआय'- ४१७ खासगी 'आयटीआय'-५५९ सरकारी 'आयटीआय' मधील जागा- ९२,३११ खासगी 'आयटीआय' मधील जागा- ४०,८०३ अर्ज दाखल- दोन लाख ५८ हजार ५६८


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GOSmSS
via IFTTT

Post a Comment

0 Comments