शिष्यवृत्तीबाबतचा खुलासा धूळ खात, आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय कधी?

अनुसूचित जमातीतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मागील ३ वर्षे शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे समोर आले आहे. शिक्षण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे १६ हजार आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीविना राहिले आहे. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण आयुक्तांकडे पाठविला आहे. दरम्यान यावरील खुलासा धूळखात पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार? हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/23Yaqpo
via IFTTT

Post a Comment

0 Comments