Also visit www.atgnews.com
सीबीएसई परीक्षा: आज अंतिम निर्णय
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेबाबत येत्या काही तासांत परिस्थिती स्पष्ट करणार आहे. आतापर्यंतच्या वेळापत्रकानुसार सीबीएसई बोर्डाच्या उर्वरित परीक्षा १ ते १५ जुलै दरम्यान घेण्यात येणार आहेत, परंतु देशातील अनेक राज्ये यासाठी तयार नाहीत. बोर्डाच्या परीक्षेच्या विषयावर सीबीएसई बोर्डाने सांगितले, निर्णय घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. गुरुवारी अंतिम निर्णय होईल. वास्तविक, गुरुवारी सीबीएसई आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आपला निर्णय कळवावा लागणार आहे. करोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक पालक आणि राज्य सरकारांनी सीबीएसईने उर्वरित परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. या परीक्षांचा अंतिम निर्णय घेण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालय गृहमंत्रालयाशी सल्लामसलत करीत आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सीबीएसई परीक्षा घेण्याबाबत बोर्डाचा अंतिम निर्णय गुरुवारी बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला कळवायचा आहे. यासंदर्भातली सुनावणी गुरुवारी २५ जून रोजी होणार आहे. आयसीएसई परीक्षांबाबतची सुनावणीदेखील मुंबई हायकोर्टात सुरू आहे. याबाबतची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. 'सर्वोच्च न्यायालयात सीबीएसई व आयसीएसई अशा दोन्ही बोर्डाच्या नियोजित परीक्षांना आव्हान देणाऱ्या याचिका प्रलंबित आहे. त्याविषयी आज, गुरुवारी सुनावणी होणार असल्याने केंद्र सरकार बुधवारीच अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने सध्या आदेश न काढता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करावी', अशी विनंती केंद्रार्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात केली. त्यामुळे राज्य सरकारने आपल्या निर्णयाची प्रत न्यायालयात सादर करण्याबरोबरच प्रतिवादींनाही द्यावी, असे निर्देश देऊन खंडपीठाने सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयल निशंक यांना दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेबाबत पत्र लिहिले आहे. मनीष सिसोदिया यांनी केंद्र सरकारला दहावी व बारावीच्या उर्वरित बोर्ड परीक्षा घेऊ नयेत असे सांगितले आहे. निशांक यांना लिहिलेल्या पत्रात सिसोदियांनी म्हटले आहे की करोनाव्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत बोर्ड परीक्षा घेणे खूप अवघड आहे. सद्य परिस्थिती पाहता या बोर्ड परीक्षा रद्द करण्यात याव्यात. दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत २६६ कंटेन्मेंट झोन आहेत, जे आणखी वाढू शकतात. सीबीएसईच्या म्हणण्यानुसार कंटेन्मेंट झोनमधील शाळांमध्ये परीक्षा होणार नाहीत, तर या झोनमधून येणारी मुले परीक्षेला कशी बसतील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31bgcG1
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments