Also visit www.atgnews.com
CBSE ने अभ्यासक्रमातून वगळले 'हे' विषय
जे विद्यार्थी पुढील वर्षी सीबीएसी बोर्डाच्या परीक्षा देणार आहेत, त्यांना सार्वभौमत्व, नागरिकत्व, राष्ट्रीयता, डिमॉनेटायझेशन आणि लोकशाही हक्क या विषयांचा अभ्यास करावा लागणार नाही. कारण या विषयांसह इतर अनेक विषय यंदाच्या वर्षाकरिता अभ्यासक्रमातून वगळले आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने इयत्ता नववी ते बारावीचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अभ्यासक्रम काय असेल ते बोर्डाने बुधवारी जाहीर केले. या विषयांवरील प्रश्न अंतर्गत मूल्यमापन किंवा वार्षिक परीक्षेला येणार नाहीत, मात्र शिक्षकांनी ते काही अंशी विद्यार्थ्यांना समजावून सांगायचे आहेत. अद्ययावत अभ्यासक्रमानुसार दहावी इयत्तेसाठी लोकशाही आणि वैविध्यता, लिंगभेद, धर्म आणि जात, प्रसिद्ध चळवळी आणि लोकशाहीसमोरील आव्हाने या विषयांशी संबंधित पाठ वगळ्ण्यात आले आहेत. अकरावीसाठी संघराज्यवाद, नागरिकत्व, राष्ट्रीयत्व, सार्वभौमत्व आणि भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थाचा विकास हे विषय अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आले आहेत. इंग्रजी विषयात लेटर टू एडिटर, जॉब अॅप्लिकेशन लेटर सारखे विषय वगळण्यात येणार आहेत. बारावीसाठी विद्यार्थ्यांना भारताचे परराष्ट्र संबंध हा विषय यंदापुरता वगळण्यात आला आहे. पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ या देशांशी भारताचे संबंध, भारताच्या आर्थिक विकासाचे बदलते स्वरुप, भारतातील सामाजिक चळवळी आणि डिमॉनिटायझेशन हे विषय वगळले आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने विवेकबुद्धीने हा अभ्यासक्रम कमी केला आहे, मात्र त्याच्या गाभ्याला हात लावलेला नाही. हे टॉपिक शिक्षकांनी विदयार्थ्यांना काही अंशी समजावून सांगायचे आहेत, मात्र यंदा अंतर्गत मूल्यमापन किंवा अंतिम परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास करावा लागणार नाही. कोविड - १९ विषाणू्च्या संक्रमणामुळे विद्यार्थ्यांचे खूप शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर्षी अध्यापनाचे तास कमी झाले आहेत. म्हणून बोर्डाने अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गासाठी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम २१ ते ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याता निर्णय घेतला आहे. एखादा पाठ अभ्यासातून पूर्णपणे वगळण्यापेक्षा एखाद्या पाठाचे काही टॉपिक किंवा संकल्पना हटवली जाऊ शकते का याबाबतच्या सूचना सीबीएसईने एनसीईआरटीकडून मागवल्या होत्या. सीबीएसई संलग्न शाळांमधील आठवी आणि त्याहून खालील इयत्तांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याची सवलत त्या शाळांना देण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Ci0fmM
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments