'या'राज्यांमध्ये आता नवीन वर्षातच उघडणार शाळा

नोव्हेंबर महिन्यात वाढलेली थंडी आणि काही राज्यांमध्ये सुरू झाल्यानंतर मुलांमध्ये कोविड-१९ चा संसर्ग झाल्याची नोंद या कारणांमुळे विविध राज्य सरकारांनी तूर्त शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काही राज्यांनी शाळा उघडल्या होत्या, पण करोना संक्रमणामुळे पुन्हा त्या बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. राजस्थान, जम्मू-काश्मीर, आसाम इत्यादी राज्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. आसाम : राज्य सरकारने पुढील वर्षी म्हणजेच १ जानेवारी २०२१ पासून सर्व सरकारी आणि खासगी शाळा सुरू करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. राज्यात कोविड -१९च्या साथीच्या आजाराची स्थिती लक्षात घेता, राज्य शासनाने ३० नोव्हेंबर,२०२० रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, शाळांमध्ये इयत्ता ६ वी ते इयत्ता १२ वीसाठी प्रत्यक्ष वर्ग घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. तथापि, साथीच्या परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतरच या संदर्भातील अंतिम निर्णय राज्य सरकारमार्फत घेण्यात येईल. त्याचबरोबर राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील अंतिम वर्षाचे विद्यार्थी आणि शाळांमध्ये दहावी आणि बारावीच्या निवासी विद्यार्थ्यांसाठी १५ डिसेंबरपासून वसतिगृहे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. राजस्थान : राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२० पर्यंत सर्व शासकीय आणि अशासकीय शाळा तसेच महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. यापूर्वीही सरकारने ३० नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली होती, जी पुढील एक महिन्यासाठी वाढविण्यात आली आहे. राज्यात कोविड -१९ च्या वाढत्या घटना लक्षात घेता राज्य सरकारने ही घोषणा केली आहे. जम्मू-काश्मीर : प्रशासनाने सर्व सरकारी आणि खासगी शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याची घोषणाही केली आहे. राज्य कार्यकारिणी समितीचे अध्यक्ष आणि मुख्य सचिवांनी रविवार, २९ नोव्हेंबर, २०२० रोजी जारी केलेल्या सूचनांनुसार करोनाग्रस्तांची वाढती संख्या तसेच अतिवृष्टीचा परिणाम लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश : राज्य सरकारने सोमवारी निर्णय घेतला की राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये ३१ डिसेंबर २०२० पर्यंत बंद राहतील. १ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा उघडण्यास परवानगी देण्यात आली होती, परंतु संसर्ग झाल्याचे लक्षात घेता राज्य सरकारने २५ नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद करण्याची घोषणा केली. राज्य सरकारचे संसदीय कार्यमंत्री सुरेश भारद्वाज म्हणाले की, आता ३१डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहतील. दिल्ली : आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनी नुकतीच दिल्लीत सरकारी आणि खासगी शाळा सुरू करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारला खात्री वाटल्याशिवाय शाळा सुरू होणार नाहीत. राज्यात २३ नोव्हेंबर २०२० पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती, मात्र पालकांकडून मिळालेला अल्प प्रतिसाद, दिवाळीनंतर कोविड-१० संक्रमण स्थितीत झालेली वाढ या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोडला. परिणामी, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आदि प्रमुख महानगरपालिकांसह अनेक महापालिका क्षेत्रातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने घेतला.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2KULomO
via IFTTT

Post a Comment

0 Comments