अकरावी प्रवेश प्रक्रिया तूर्त ऑनलाइनच: वर्षा गायकवाड

म. टा. प्रतिनिधी, मुंबई करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या ऑनलाइन आहे. यापुढील काळातही करोनाची परिस्थिती पाहून पुढील वर्षासाठी ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन करावी किंवा कसे याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याबाबत सदस्य सतीश चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. सरकारने गुणवत्ता व पारदर्शकतेच्या आधारावर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली. करोनामुळे प्रवेश व शुल्क ऑनलाइन घेण्यात आले. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये इतर भागातील विद्यार्थीही प्रवेश घेत असतात व काही विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्सला जात असल्याने काही जागा रिक्त राहतात. परंतु या जागा रिक्त राहू नये ही सरकारची भूमिका आहे, असे गायकवाड यांनी सांगितले. पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कायदा अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने उच्च प्राथमिक म्हणजेच सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या पात्रतेमध्ये बदल केला आहे. त्यानुसार सरकारने १३ ऑक्टोबर, २०१६ रोजी काढलेल्या शासन परिपत्रकानुसार शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करावी अशा सूचना क्षेत्रीय स्तरावर दिल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. महाअधिवक्त्याचे मत घेणार शिक्षक पात्रता परीक्षेबाबत कायद्यात राज्याची दुरुस्ती करण्याबाबत महाधिवक्ता यांचे मत विचारात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. नागोराव गाणार यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिले. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे शिक्षकांना आवश्यक आहे. ही किमान अर्हता प्राप्त करण्यासाठी वाढीव संधी देण्याची बाब केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. ज्या शिक्षकांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांना ती आयुष्यभरासाठी लागू राहावी, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी सभापतींकडे लवकरच बैठक आयोजित करणार असल्याची माहितीही गायकवाड यांनी दिली. हेही वाचा : पदोन्नती, वेतन निश्चिती राज्यातील सहयोगी प्राध्यापक पदोन्नती व वेतन निश्चिती पडताळणीबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या त्रुटी निवारण समितीकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असून ते प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतची योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्यात सुमारे ५०० पैकी २६० प्राचार्यांची भरती केली आहे. उर्वरित पदांबाबत वित्त विभागाने परवानगी दिल्यानंतर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30fWvLy
via IFTTT

Post a Comment

0 Comments