Also visit www.atgnews.com
३३ टक्के विद्यार्थी घेणार दहावी, बारावी परीक्षांमधून ड्रॉप?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई दहावी व बारावीची परीक्षा नेमकी कशी होणार याबाबत असलेली संभ्रमावस्था; तसेच वर्षभर ऑनलाइन माध्यमातून पूर्ण न झालेला अभ्यासक्रम इत्यादी कारणांमुळे यंदा सुमारे ३३ टक्के विद्यार्थी दहावी व बारावीची परीक्षा न देण्याचा निर्णयापर्यंत पोहोचत आहेत, तर २३ टक्के विद्यार्थी याबाबत गोंधळाच्या स्थितीत आहेत. यू-ट्यूबवरून मोफत शिक्षण देणाऱ्या विविध अनुदानित; तसेच विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांनी एकत्र येऊन दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेबाबत मत जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केले. याला राज्यभरातून एक लाख ५८ हजार ६०१ विद्यार्थी व पालकांनी प्रतिसाद दिला. यामध्ये काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष नोंदविण्यात आले. यामध्ये परीक्षा ऑनलाइन व्हावी, असे मत ६१ टक्के विद्यार्थ्यांनी नोंदविले आहेत, तर १९ टक्के विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा व्हावी, असे मत नोंदविले आहे. परीक्षा ऑफलाइन झाली, तर परीक्षा केंद्रांवर पोहचण्यासाठी प्रवास करण्यास तयारी नसल्याचे मत ५३ टक्के विद्यार्थ्यांनी नोंदविले. तर ७५ टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याला ७९ टक्के विद्यार्थ्यांनी नाराजी दर्शविली आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचा केवळ ५० टक्केच अभ्यासक्रम पूर्ण झाल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले, तर स्वअभ्यास करून १०० टक्के अभ्यास पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे अवघे एक टक्का इतकेच आहे. सुमारे ८४ टक्के विद्यार्थ्यांनी बोर्डाचा अभ्यासक्रम आणखी कमी करावा, असे मत यात नोंदविले आहेत. सद्यस्थिती लक्षात घेता परीक्षा पद्धतीमध्ये बदल करावा, असे मत या सर्वेक्षणात ७९ टक्के विद्यार्थ्यांनी नोंदविले आहे. दहावी व बारावीच्या परीक्षांबाबत मोठ्या प्रमाणावर संभ्रम आहे. यात विद्यार्थी व पालक यांना नेमके काय वाटते, हे जाणून घेण्याच्या उद्देशाने सांताक्रूझ येथील शाळेतील गणित शिक्षक दिनेशकुमार गुप्ता यांनी सर्वेक्षण करण्याचे ठरविले. गुप्ता यांच्यासह अनेक शिक्षक यू-ट्युबवर गेल्या अनेक वर्षांपासून मोफत विद्यादानाचे काम करत आहेत. यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी गुप्ता यांनी या सर्व शिक्षकांना एकत्र आणून राज्यातील ३६ जिल्ह्यांपर्यंत पोहोचून हे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. परीक्षेबाबत शिक्षकांनी केलेल्या काही सूचना - राज्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी ५०:५० पद्धतीने मूल्यांकन करावे. यात ५० टक्के अंतर्गत तर ५० टक्के लेखी परीक्षा अशा पद्धतीने परीक्षा व्हावी. - मंडळाने परीक्षेसाठी ऑनलाइन, ऑफलाइन असे दोन्ही पर्यायने खुले ठेवावेत. - ऑफलाइन परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना केंद्र निवडीचा पर्याय द्यावा. - आतापर्यंत प्रात्यक्षिक परीक्षा झालेल्या नाहीत. यामुळे यंदा प्रात्यक्षिक परीक्षांऐवजी असाइनमेंट किंवा प्रकल्पाधारीत गुण द्यावेत. - मंडळाने विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून द्यावा.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kXLnwq
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments