CBSE 10th Result 2021: अंतर्गत मूल्यमापनासाठी सीबीएसईचा आराखडा

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) बोर्डांतर्गत येणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, या आराखड्यामध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून निकाल () जाहीर करण्यात येणार आहेत. या निकालासाठी प्रत्येक शाळेने सात सदस्यांची निकाल समिती नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये झालेल्या विविध ऑनलाइन परीक्षा प्रकारांसाठी विशिष्ट गुण नमूद करण्यात आले आहेत. निकाल कधी? सीबीएसई बोर्डाने दहावीच्या निकालाची तयारी सुरू केली आहे. बोर्डाने ई-परीक्षा पोर्टलवर एक लिंक अॅक्टिव्ह केली आहे. यासह देशभरातील शाळांना निर्देश दिले आहेत की या पोर्टलवर विद्यार्थ्यांचे गुण अपलोड करण्यास सुरूवात करावी. शाळांना दहावीचा निकाल तयार करण्यासाठी २५ मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यानंतर ५ जून २०२१ पर्यंत दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे गुण या पोर्टलवर अपलोड करायचे आहेत. हे गुण अपलोड झाल्यानंतर सीबीएसई अंतिम निकाल तयार करणार आहे. बोर्डाच्या माहितीनुसार २० जून २०२१ पर्यंत निकालाची घोषणा केली जाईल. सीबीएसई अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना या आराखड्यानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करायचे आहे. यामध्ये प्रत्येक शाळेकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या ‘निकाल समिती’मध्ये मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली सात शिक्षकांची समिती असणार आहे. ज्यामध्ये गणित, भाषा, विज्ञान, सामाजिक शास्त्र असे विषय शिकवणारे पाच शिक्षक असतील, तर दोन शिक्षक परिसरातील इतर सीबीएसईच्या शाळांमधील असणार आहेत. निकालाची प्रक्रिया नि:पक्ष पद्धतीने पार पडावी, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. सीबीएसईच्या शाळांमध्ये वर्षभरात दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या परीक्षा घेण्यात आल्या. वर्षभराचे मूल्यांकन करण्यासाठी प्रत्येक परीक्षेतील कामगिरीनुसार विद्यार्थ्यांना गुण द्यायचे आहेत. चाचणी परीक्षेसाठी दहापैकी, सहामाही परीक्षेसाठी तीसपैकी आणि दहावी पूर्व परीक्षेसाठी चाळीस पैकी गुण द्यावेत, असे निश्चित करण्यात आले आहे. एखाद्या शाळेने जर तीन किंवा चार पूर्व परीक्षा घेतल्या असतील, तर त्या परीक्षांपैकी ज्या परीक्षेत विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली आहे, ती परीक्षा गृहित धरावी, असेही बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या शाळेने कोणतीही परीक्षा घेतलेली नाही त्या शाळेच्या ‘निकाल समिती’वर गुणांकन करण्याची जबाबदारी असणार आहे. सीबीएसईचा मूल्यमापन आराखडा दृष्टिक्षेपात १. निकालासाठी प्रत्येक शाळेची सात शिक्षकांची समिती २. सातपैकी दोन शिक्षक इतर शाळांमधील असणे बंधनकारक ३. मू्ल्यमापन करताना चाचणीला १०, सहामाहीला ३० तर पूर्व परीक्षेला ४० मार्कांचा अधिकतम दर्जा ४. एकूण ८० गुणांचे मूल्यमापन


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Qd7yDS
via IFTTT

Post a Comment

0 Comments