Also visit www.atgnews.com
विद्यार्थी लागले अभ्यासाला; २० गुणांच्या अंतर्गत मूल्यामापन प्रक्रियेचे काम सुरू
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई दहावीची परीक्षा रद्द केली असली तरी विद्यार्थी पुन्हा अभ्यासाला लागले आहेत. अनेक शाळांमध्ये २० गुणांच्या अंतर्गत मूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम आता सुरू झाले आहे. यासाठी या विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाला सुरुवात करावी लागली आहे. तर खासगीरित्या बसलेल्या विद्यार्थ्यांना अद्याप कोणत्याही सूचना न मिळाल्याने त्यांच्या गोंधळात आणखीनच वाढ झाली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करत असताना कोणत्या प्रक्रियेचा अवलंब करायचा याबाबत राज्य शिक्षण मंडळाने स्पष्टता आणली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या नववी आणि दहावीच्या गुणांचा विचार केला जाणार आहे. इयत्ता नववीच्या गुणांचे ५० पैकी रूपांतर केले जाणार आहे. तर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आतापर्यंत शाळेत दहावीच्या घेतलेल्या ऑनलाइन किंवा अन्य परीक्षांचे ३० पैकी गुणांचे रूपांतर करण्यात येणार आहे. तर २० गुणांचे अंतर्गत मूल्यमाापन केले जाणार आहे. काही शाळांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र बहुतांश शाळांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्याने आता व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून किंवा प्रकल्पाच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा हातात पुस्तके घ्यावी लागली आहे. 'खासगी'ची प्रक्रिया आव्हानात्मक राज्यभरातून यंदा दहावीच्या परीक्षेला बसलेल्या खासगी विद्यार्थ्यांना दहावी पास होण्यासाठी त्यांनी पाचवीत मिळवलेले गुण निर्णायक ठरणार आहेत. हे गुण आता शाळांना जमा करून मंडळाकडे सादर करावे लागणार आहे. यासाठी शिक्षकांची मोठी दमछाक होणार असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. ही प्रक्रिया सहा दिवसांत पूर्ण करायची आहे. इतक्या कमी दिवसांत या विद्यार्थ्यांच्या मागील शाळेतून सर्व डेटा मिळण्यास उशीर होण्याची भीती शिक्षकांना सतावत आहे. त्यामुळे शाळा आणि शिक्षकापुढे हे मोठे आव्हान असल्याचे शिक्षक संघटनाच्या प्रतिनिधींनी सांगितले. याचबरोबर या विद्यार्थ्यांना अद्याप सर्व विषयांच्या कार्यपुस्तिकाही मिळालेल्या नाही यामुळे या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार, असा प्रश्न पडला आहे. कला, क्रीडा गुणांसाठी मुदतवाढ दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा या विषयासाठी देण्यात येणाऱ्या गुणांचे प्रस्ताव सादर करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या या मुदतवाढीमुळे राज्यातील क्रीडा विषय असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाची दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आठवी आणि नववीतील क्रीडा स्पर्धेतील सहभाग तर बारावीच्या विद्यार्थ्यांचा अकरावीमधील क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन क्रीडा कोट्यातील सवलतीचे गुण देण्यात येणार आहेत. हे प्रस्ताव सादर करण्यासाठी मंडळाने १२ ते २१ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे तर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना संबंधित विभागीय शिक्षण मंडळाकडे विद्यार्थ्यांची प्रस्ताव यादी पाठविण्यासाठी १५ ते २५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या दिलेल्या मुदतीत कोणतीही वाढ केली जाणार नाही, असे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xdL1Xi
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments