सीबीएसई बारावीच्या विशेष परीक्षेचा निकाल 'या' तारखेला होणार जाहीर

Date and Time: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSE) बारावीच्या विशेष परीक्षेचा निकाल ३० सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर करण्यात येईल. सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली. बारावी खासगी विद्यार्थी आणि विशेष परीक्षेचा निकाल ३० सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर होणार आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमधील विशेष परीक्षेत सहभागी झालेले झालेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर cbse.gov.in वर जाऊन निकाल तपासू शकतात. बारावी सीबीएसई सुधार परीक्षा २५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान घेण्यात आली. बोर्डातर्फे लवकरच दहावीच्या विशेष परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थी त्यांच्या रोल नंबर आणि जन्मतारखेच्या मदतीने त्यांचा निकाल तपासू शकतात. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांसाठी यावर्षी साधारण ३५ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. करोना प्रादुर्भावाच्या साथीमुळे परीक्षा रद्द करण्यात आली आणि अंतर्गत मूल्यांकन धोरणाच्या आधारे निकालाची घोषणा करण्यात आली. एकूण नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी ३० टक्के विद्यार्थी यावर्षी विशेष ऑफलाइन परीक्षेला उपस्थित होते. 'या' विद्यार्थ्यांचे परीक्षा आणि नोंदणी शुल्क माफ करोना प्रादुर्भावात आपले पालक किंवा दत्तक पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क किंवा नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही असा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार, बोर्डाशी संलग्न शाळांना अशा विद्यार्थ्यांचा तपशील देण्यास सांगितले आहे. अशा विद्यार्थ्यांची सत्यता पडताळून एलओसी सादर करण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी २०२१-२२ साठी शाळांना एलओसीसाठी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत तपशील सादर करायचा आहे. त्यानंतर विलंब शुल्कासहित ९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत माहिती द्यावी लागणार आहे. दहावी आणि बोर्ड परीक्षा २०२२ अंतर्गत टर्म १ परीक्षा नोव्हेंबर २०२१ मध्ये घेण्यात येणार आहे. टर्म १ परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक (टर्म १) १० ऑक्टोबरपर्यंत जाहीर केले जाणार आहे. वर्ष २०२२ साठी सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात येणार आहेत. टर्म १ परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आणि टर्म २ ची परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये होणार आहे. सत्र २०२१-२२ साठी दोन सत्रांमध्ये दहावी आणि बारावी परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला होता. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही टर्मच्या परीक्षांना ५० टक्के अभ्यासक्रम असणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ohrDHz
via IFTTT

Post a Comment

0 Comments